✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - संवादावर आधारित प्रश्न*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्रश्न १ ते ५ साठी सूचना : खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय निवडा.
"अद्वया, जान्हवी, आराध्या, राजनंदिनी मास्क लावलास ना गं ?"
"हो, हो गं स्वरांजली अजूनही कोरोना आहे ना. मास्क घातला नाही तर धोका होतो." अद्वया म्हणाली.
"पण आपल्याला लस मिळालीय ना?" आराध्या म्हणाली.
"लस मिळाली तरी हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे." राजनंदिनी म्हणाली.
"माझी आई नेहमी सांगते, हात नीट धुवून जा आणि गर्दीत उभी राहू नको." जान्हवी म्हणाली.
"शाळेतही शिक्षक वारंवार सांगतात नियम पाळा म्हणून." अद्वया म्हणाली.
"हो खरंच, आपण काळजी घेतली तर आपलं आणि इतरांचं रक्षण होईल." राजनंदिनी म्हणाली.
"बरोबर आहे, चला आता नियम पाळून शाळेत जाऊ." सर्वजणी एकत्र म्हणाल्या.
प्रश्न १) संवादाची वेळ कोणती आहे ?
१) सकाळ
२) दुपार
३) सायंकाळ
४) रात्र
प्रश्न २) वरील संवादामध्ये जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे ?
१) चार
२) पाच
३) सहा
४) सात
प्रश्न ३) कोरोना रोगावरील कोणते उपाय वरील संवादात सांगितलेले नाहीत ?
१) मास्क वापरणे.
२) गर्दीत उभं राहावे .
३) सॅनिटायझर वापरणे.
४) लस घेणे.
प्रश्न ४) वरील संवादात कोणती मैत्रीण शाळेत जाताना सर्वांना मास्क वापरण्यास लक्ष वेधते ?
१) राजनंदिनी
२) स्वरांजली
३) अद्वया
४) जान्हवी
प्रश्न ५) संवादानुसार, मुलींनी कोरोना प्रतिबंधक उपाय पाळल्यास काय होईल?
१) काही फरक पडणार नाही.
२) फक्त स्वतः सुरक्षित राहतील.
३) स्वतःसह इतरांचं रक्षणही होईल.
४) फक्त शाळेतच सुरक्षित राहतील.

No comments:
Post a Comment