✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *उतारा वाचन*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
उतारा – १
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत. वेगवेगळे सण, साजरे करण्याच्या पद्धती आणि खाद्यसंस्कृती सर्वत्र बदलत जातात. तरीही सर्व भारतीय एकमेकांशी प्रेमाने राहतात. शाळांमध्येही विद्यार्थ्यांना एकता, सहकार्य आणि देशप्रेमाच्या मूल्यांचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी परस्परांमध्ये आदराने वागावे आणि सर्व परंपरांचा सन्मान करावा, असा संदेश शाळांमध्ये दिला जातो.
प्र.1) भारत कशासाठी ओळखला जातो?
1. एकाच संस्कृतीसाठी
2. विविधतेसाठी
3. परदेशी प्रथा
4. समुद्रासाठी
प्र.2) शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणती मूल्ये शिकवली जातात?
1. भांडण
2. एकता आणि सहकार्य
3. परदेशप्रेम
4. शिस्त नसणे
प्र.3) भारतातील विविधता कशात दिसून येते?
1. भाषा, संस्कृती आणि परंपरा
2. केवळ हवामानात
3. फक्त वाहतुकीत
4. खेळांमध्ये
उतारा – २
पावसाळा येताच निसर्गाचे सौंदर्य खुलते. डोंगर-घाट हिरवाईने नटतात. शेतकरी पेरणीची तयारी करतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नवीन वर्षाची सुरुवात होते. पावसात भिजायला मुलांना खूप आवडते, पण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. छत्री किंवा रेनकोट वापरणे, ओल्या कपड्यांपासून दूर राहणे आणि उकळून पाणी पिणे हे पावसाळ्यात महत्त्वाचे असते.
प्र.1) पावसाळ्यात निसर्ग कसा दिसतो?
1. ओसाड
2. काळोखा
3. हिरवाईने भरलेला
4. धुळीने माखलेला
प्र.2) पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?
1. ओले कपडे तसेच ठेवणे
2. रेनकोट वापरणे
3. गलिच्छ पाणी पिणे
4. घराबाहेर न जाणे
प्र.3) शाळांमध्ये पावसाळ्यात कोणत्या गोष्टीची सुरुवात होते ?
1. वार्षिक परीक्षा
2. नवे शैक्षणिक वर्ष
3. उन्हाळी शिबिर
4. क्रीडा स्पर्धा

No comments:
Post a Comment